सातारा – जावली मतदार संघातील विकास कामत कुठेही कमी पडणार नाही – आ शिवेंद्रसिंहराजे [ जावलीतील आजी , माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले ( महाराज साहेब ) च्या पाठीशी ठाम ]
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
मेढा ( करंजे ) : सातारा- जावली मतदारसंघात प्रत्येक गावातील विकासकामे मार्गी लावली आहेत. वाडी-वस्ती विकासाच्या प्रवाहात आणली. एखादे काम करायचे शिल्लक आहे, अशी बोटावर मोजण्या एवढीपण गावे नाहीत. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार विकासकामे मार्गी लावली आहेत. आत्ताच्या निवडणुकीत मला जे गाव शंभर टक्के मतदान करेल त्या गावाला २५ लाखाचा निधी आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ उपलब्ध करून देऊ असा विश्वास सातारा-जावली मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला.
करंजे, ता. जावली येथे आ.शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारार्थ जावली तालुक्यातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न झाला. जावली तालुक्यातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना एकमुखी पाठिंबा दर्शवून शिवेंद्रसिंहराजेंच्या विजयात मोलाचा वाटा उचलण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, श्रीहरी भाजपचे तालुकाध्यक्ष गोळे, आरपीआयचे
एकनाथ रोकडे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा-जावलीच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहिलो आहे. महायुतीचे सरकार असल्याने गेल्या काही वर्षात हजारो कोटींची विकासकामे झाली आहेत. आगामी काळातही महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे जावलीतील विकासपर्व कोणीही थांबवू शकत नाही. आपण सर्वांनीच महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. काही लोक निवडणुकीपुरते उगवतात, मोठमोठ्या वल्गना करतात. त्यांच्या हातून एका रुपयाचे तरी काम झाले आहे का याचा विचार समस्त जावलीकरांनी करावा आणि महायुतीलाच मतदान करावे, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. अजित मर्देकर यांनी प्रास्ताविक केले.प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम खुडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला समाधान पोफळे, बजरंग चौधरी , विजय सपकाळ, सचिन दळवी, पुंडलीक पार्टे, अमोल आंग्रे, संतोष केंजळे, संजय शेलाटकर, रविंद्र सल्लक , बापू कांबळे, संतोष महामूलकर, साहेबराव पवार , विलास धनावडे , विलास शिर्के , विठ्ठल शिंदे यांच्यासह १५३ पैकी १५० गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.