जळीतग्रस्त शेतकरी बांधवांना ध्रुव प्रतिष्ठानची मदत.


भोर प्रतिनिधी: सागर खुडे

तालुक्यातील मौजे पसुरे येथे नुकत्याच काही दिवसापूर्वी श्री.तानाजी शिवाजी धुमाळ या शेतकरी बांधवाच्या गवत व पेंढ्याच्या ४ गंजी अज्ञाताने पेटवून दिल्या असता सर्व गवत जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न जळीतग्रस्त शेतकऱ्यासमोर उभा राहिला होता. गावातील व शेजार्‍यापाजाऱ्यांनी तात्पुरता स्वरूपात पेंढा उपलब्ध करून दिला होता पण गोठ्यामध्ये अख्खा उन्हाळा आणि पावसाळा जनावरांना खाण्यासाठी चारा कुठून आणण्याचा हा प्रश्न निर्माण झाला होता. पसुरे येथील तंटामुक्ती अध्यक्ष श्री. मनोज धुमाळ यांच्या माध्यमातून राजीव केळकर यांना ही माहिती मिळताच वस्तुस्थिती लक्षात घेऊन

श्री.तानाजी शिवाजी धुमाळ यांना भोलावडे येथील शेतकरी श्री.नाना जगदाळे यांच्या शेतातील तब्बल २०० पेंढ्यांची गंज व १०० कडबा पेंढ्या उपलब्ध करून दिल्या.

ADVERTISEMENT

 

आतापर्यंत अनेक ठिकाणी ध्रुव प्रतिष्ठान आपत्ती संकट समयी धावून आलेले आहे.यामध्ये रिस्क्यू साहित्य मदत, पूरग्रस्त ठिकाणी विविध प्रकारची मदत, पावसाळ्यात रस्त्यावर पडलेली झाड दूर करणे असो, घर,गवत, जळीतग्रस्त ठिकाणी तातडीची मदत संस्था करत असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष

श्री. राजीव केळकर यांनी सांगितले

या वेळी ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक -अध्यक्ष श्री.राजीव केळकर , श्री.राहुलजी खोपडे,पसुरे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री.मनोज धुमाळ,प्रगतशील शेतकरी श्री.बापू दगडू धुमाळ, श्री.शंकर पर्वती धुमाळ, श्री.तानाजी शिवाजी धुमाळ, श्री.नाना जगदाळे आदी मंडळी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!