पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा कोसळला; शिवप्रेमींनी व्यक्त केला संताप.
प्रतिनिधी : शंकर माने
शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा सोमवार
(दि. २६)कोसळला आहे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटाचा होता 4 डिसेंबर २०२४ रोजी मालवण मधील तारकर्ली समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण झाले होते शिवाजी महाराजांचा पुतळा हा निष्कृष्ट कामामुळे कोसळ आहे त्याबद्दल आम्हाला दुःख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही त्याचा निषेध करत सहा महिन्यापूर्वी कोट्यावधी खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता असे स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे वर्षापूर्वी उभारलेले किल्ल्याचा एकही भाग चिरा ढासळला नाही पण सहा महिन्यापूर्वी येथील काम ढासळले याप्रकरणी दोषीवर कारवाई झाली पाहिजे नाहीतर जिल्ह्यात राज्यभर आंदोलन करण्यात येईल असंच सर्व शिवप्रेमींनी आंदोलन करावे असे आमदार वैभव नाईक आणि म्हटले आहे.