माणूस जन्माला आला नसून माणसाने आपले जगणे सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे


[

दिलीप वाघमारे

समाज्यामध्ये हिंसा, द्वेष, मत्सर वाढत असुन माणसाची समृध्दी वाढत असताना संस्काराची कमतरता जाणवु लागली आहे,

माणुस तयार करताना देवाने थोडा जरी भ्रष्टाचार केला असता तर प्रत्येकाच्या वाटयाला एक व्यंग आले असते,लोकसंग्रह पैसा कमावण्यासाठी नसावा तर

माणसाच्या जीवनाची उंची वाढण्यासाठी असावा, समाज्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी ठोस कृती अथवा निषेधव्यक्त कृती करावी लागणार आहे,पॅकेज,पेस्टेज व प्रॉपर्टी हे माणसाचे जगणे झाले असुन या गोष्टीसाठी माणुस जन्मला आला नसुन माणसाने आपले जगणे सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी व शिवम प्रतिष्ठान घारेवाडीचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजीत देशमुख साहेब यांनी केले.

लोणंद येथील खेमावती नदीच्या काठावर बाजारतळ येथे मा. मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय ‘खेमातीर’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमामध्ये ‘माणूस म्हणून जगताना’ या विषयावर इंद्रजीत देशमुख साहेब बोलत होते.

यावेळी पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष व सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, लोणंद क्रिडा मंडळाचे अध्यक्ष शामसुंदर डोईफोडे,लोणंद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अवधुत किकले ,लोणंद इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा डॉ मनिषा काकडे,

मराठा पतसंस्थेचे चेअरमन डॉ. अनिलराजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना इंद्रजित देशमुख म्हणाले संत माणसाला जागे करुन चांगले विचार शिकवुन सन्मार्गाने मार्गस्थ करतात,

ADVERTISEMENT

माणुस नावाची जात उठल्यापासुन झोपेपर्यत व जन्मला आल्यापासुन मृत्युपर्यत पैश्याच्या मागे पळत आहे, सत्तेचा माज,संपत्तीची मस्ती व ज्ञानाचा अंहकार माणसाला झाला आहे,ज्या घरातील माणसांची नितीमुल्य उच्च आहेत तीच माणसे आज सुखी आहेत.समाज्यात चांगुलपणा पेरणे व सकारात्मकतेची एक मशाल पेटवणे हाच या खेमातीर व्याख्यानमालेचा उद्देश आहे,

यावेळी बोलताना हरिष पाटणे म्हणाले राज्यातील सर्वात मोठा दुष्काळी तालुका ही खंडाळा तालुक्याची ओळख आता संपली असुन आता राज्यात सर्वाधिक महसुल देणारा तालुका ही खंडाळयाची नवी ओळख झाली आहे, खंडाळा तालुक्याची श्रीमंती वाढली पण वैचारिक दृष्टया तालुका मागास राहिला तर मोठा अनर्थ होणार आहे, लोणंदच्या सर्वजनिक जीवनाला आकार देण्याचे काम या व्याख्यानमालेच्या माध्यमातुन होणार असुन खेमातीर समृध्द करण्याच्या मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानच्या प्रयत्नास लोणंदकर आगामी काळात भरघोस सहकार्य करतील..

नगराध्यक्षा मधुमती गालिंदे,उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी,शंकरराव क्षीरसागर,भरत शेळके, सचिन शेळके,भरत बोडरे, तृप्ती घाडगे, ज्योती डोनीकर, राजेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते,प्रास्ताविक डॉ अनिलराजे निबांळकर

यांनी केले, सुत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव ॲड. गजेंद्र मुसळे यांनी केले, पाहुण्याचा परिचय खजिनदार सुनिल शहा यांनी केला,आभार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रविंद्र क्षीरसागर यांनी मानले.कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शेळके,

उपाध्यक्ष उदयसिंह जगताप,लोणंद बाजार समितीचे सभापती सुनिल शेळके,पत्रकार शशिकांत जाधव,

पत्रकार रमेश धायगुडे,पत्रकार ज्ञानेश्वर ससाणे यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!