आबईचीवाडी येथील ग्रामपंचायत शिपायाचा शॉक लागून जागीच मृत्यू


 

कराड प्रतिनिधी शंकर माने 20 जुलै: ग्रामपंचायत शिपायाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी कराड तालुक्यातील आबईचीवाडी येथे घडली. राजेंद्र शंकर जाधव (वय असून 48) असे संबंधित मृत्यू झालेल्याचे शिपायाचे नाव असून त्यांचे चुलत बंधू या दुर्घटनेतून बचावले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील आबईचीवाडी गावातील ग्रामपंचायतीमध्ये राजेंद्र जाधव हे शिपाई म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे गावातील पाणीपुरवठा योजनेचे पाणी लोकांना पिण्यासाठी सोडण्याची जबाबदारी होती. आज सकाळी राजेंद्र जाधव यांनी नेहमीप्रमाणे ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेचे पाणी लोकांना पिण्यासाठी सुरू केले. त्यानंतर ते निघाले असताना त्यांना रस्त्यावर पडलेल्या प्रवाहित वीज तारेचा शॉक लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चुलत बंधू उत्तम दिनकर जाधव हे सुद्धा होते. यावेळी ते थोडक्यात बचावले. राजेंद्र जाधव यांना शॉक लागल्याचे लक्षात येताच बंधू उत्तम जाधव यांनी या घटनेची माहिती गावातील नागरिकांसह कुटुंबियांना दिली. माहिती मिळताच गावातील गावकरी व कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, राजेंद्र जाधव यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!