पहिल्या वर्षी खेमातीर व्याख्यानमालेस श्रोत्याचा चांगला प्रतिसाद मिळाला असुन
संपादक: दिलीप वाघमारे
या व्याख्यानमालेची किर्ती लवकरच संपुर्ण खंडाळा तालुक्यात होईल, आज प्रत्येक घरातील संवाद बंद झाला असल्याने व्याख्यानमाला समाज्याच्या दृष्टीने खुप गरजेच्या आहेत,मोबाईल मुळे संवाद संपला असुन संवाद संपल्यामुळे वेगवेगळया समस्या निर्माण होत आहेत, आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानापासुन बाजुला जाता येणार नाही मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामापासुन बाजुला जावे लागेल,खेमातीर व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला राजकीय पक्षाचे लेबल लावु नका, या व्यासपीठावर प्रत्येक वक्त्याला त्यांचे विचार मांडण्याचे वैचारीक स्वातंत्र्य दया असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकचे चेअरमन खासदार नितीन पाटील
यांनी केले.
लोणंद बाजारतळ येथे
खेमावती नदीच्या काठावर मा. मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय ‘खेमातीर’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रा अरुण घोडके यांचे ‘असे होते शंभूराजे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकचे चेअरमन खासदार नितीन पाटील बोलत होते,
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाडकर , लोणंद रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रविण चांदवडकर,माजी कृषी सभापती मनोज पवार,नगराध्यक्षा मधुमती गालिंदे,उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी,शंकरराव क्षीरसागर,भरत शेळके, सुभाष घाडगे, दयानंद खरात, लक्ष्मण शेळके, बबन शेळके,तृप्ती घाडगे,ज्योती डोनीकर, डॉ किशोर बुटियानी, डॉ मिलिंद काकडे, डॉ दयाराम सुर्यवंशी, राजेश शिंदे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शेळके,कार्याध्यक्ष रविंद्र क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रा अरुण घोडके सर म्हणाले संभाजी राज्यानी बुध्दभुषण,नखशीख, नायिकाभेद, सातसतक हे चार ग्रंथ लिहले,
औरंगजेब बादशहा हा क्रुर होता,कपटी होता पण तो प्रचंड बुध्दीमान देखील होता,
औरंगजेबाचा मुलगा अकबराने बादशहा विरुद्ध बंड पुकारल्यानंतर बादशहाच्या भितीने कोणीच अकबराला राजाश्रय देत नसताना शंभुराजानी त्यास राजाश्रय दिला ही खुप धाडसाची गोष्ट आहे,
संभाजी राजास जिवंत पकडत नाही तोपर्यत किमॉश घालणार नाही अशी शपथ बादशहा औरंगजेबाने घेतली होती मात्र शिवाजी राज्याच्या मृत्युनंतर स्वराज्य जिंकण्यास आलेल्या बादशहाचा स्वराज्यातच शेवट झाला, संभाजीराजे यांचे वजन १०६ किलो उंची ६.५ फुट होती. संभाजीराज्यानी ९ वर्षात १२८ लढाया लढल्या एकाही लढाईत त्यांचा पराभव झाला नाही,पाऊने नऊ वर्षात औरंगजेबाला स्वराज्यातील एकही किल्ला जिकंता आला नाही.औरंगजेबाला यश मिळत नव्हते म्हणुन त्याने कडक शब्दात मराठा सरदारांना पत्रे लिहली त्यानंतर ६८ सरदार फितुर झाले व बादशहास मिळाले, संभाजी राज्याना बादशहाने पकडल्यानंतर बत्तीसशिराळा येथे अप्पा शास्त्री दिक्षीत, ज्योत्याजी केसरकर, तुळाजी देशमुख या तीन मराठा सरदारानी ४०० मराठा सैन्य घेऊन संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला.बादशहाने आपल्या छावणीत संभाजी राज्याची उंटावरुन धिंड काढली,कवी कलश व संभाजी राज्याची जीभ व डोळे काढुन कवी कलशाचा शिरछेद केला, संभाजीराजांची कातडी काढुन ११ मार्च १६८९ रोजी वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करुन त्यांचा वध केला.
प्रास्ताविक बाजार समिती सभापती सुनिल शेळके यांनी केले, पाहुण्याचा परिचय पत्रकार रमेश धायगुडे यांनी केला, आभार उदयसिंह जगताप यांनी मानले, सुत्रसंचालन डॉ अनिलराजे निबांळकर,अँड गजेंद्र मुसळे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन डॉ अनिलराजे निबांळकर,प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शेळके,कार्याध्यक्ष रविंद्र क्षीरसागर, पत्रकार शशिकांत जाधव,पत्रकार रमेश धायगुडे, पत्रकार ज्ञानेश्वर ससाणे यांनी केले.