स्वराज्यभूमी प्रतिष्ठान ची नाटंबी येथे यशस्वी विरगळ संवर्धन मोहीम.
संपादक मंगेश पवार
कार्यकारी संपादक सागर खुडे
भोर :- 1 मे महाराष्ट्र दिन आणि स्वराज्यभूमी प्रतिष्ठान चा वर्धापन दिन या निमित्त विरगळ संवर्धन मोहीम नाटंबी येथे आयोजित करण्यात आली या मोहिमेत ग्रामस्थ मंडळ नाटंबी. सरपंच/उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित राहिले. नाटंबी येथील नीरा नदीचे प्रवाह पत्राचे बाजूला टेम्बी येथे ही मोहीम घेण्यात आली.
उतखनांनामध्ये 1शिवपिंड. 2 नंदी तसेच चार विरगळी. इंत्यानंदीचे अवशेष आढळून आले. सर्व अवशेष काळ्या कातली दगडात बनवण्यात आलेले होते.साधारण 5 फूटा पेक्ष जास्त खोदकाम करण्यात आले.वाढते तापमान. पावसाळ्यातील पाण्याचे प्रवाह. त्यामुळं त्या विरगळी पूर्णतः मातीने व्यापून गेलेल्या. 40 हुन अधिक ग्रामस्थ व शिवापाईक. तसेच एकश्री. रोहिदास खोपडे यांचा ट्रॅक्टर यामुळे. ही मोहीम लवकर पूर्ण झाली. त्यानंतर गरमास्थानी मस्त पैकी वेज पुलाव,जिलेबी,जेवणाचा असा बेत आयोजित केलेला. संथ वाहणाऱ्या नीरा माई च्या किनारी कारंजाच्या थंड सावलीत आनंदाने भोजनाचा आस्वाद घेतला.
यानंतर संघटनेच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. वर्षभराचा कामाचा आढावा घेण्यात आला,
नंतर सर्व शिवभक्त मार्गस्थ झाले
याप्रसंगी स्वराज्यभूमी प्रतिष्ठान चे सर्व शिवापाईक आणि विशाल खोपडे (सरपंच )विठ्ठल घाटे (पद्मावती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष )श्री.नारायण साळुंखे,विजय खोपडे, शांताराम खोपडे, पांडुरंग खोपडे,शिवाजी गोडवळे,तसेच सर्व नवतरुण मंडळ नाटंबी व ग्रामस्थ उपस्थित राहिले.


