सत्यासाठी लढणारा आवाज : पत्रकार ते अ‍ॅडव्होकेट रणजित जामखेडकर”


एस.एन.नांदेडकर

समाजात अनेक जण येतात, जगतात आणि निघून जातात… पण काही व्यक्ती आपल्या कार्याने, विचाराने आणि निर्भीड भूमिकेने काळावर ठसा उमटवतात. पत्रकार तथा अ‍ॅड. रणजित विठ्ठलराव जामखेडकर हे असेच एक प्रभावी, जिद्दी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजमनात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील मुखेड-जामखेड या जन्मभूमी ते कर्मभूमीत वाढलेले रणजित जामखेडकर यांचे आयुष्य म्हणजे संघर्ष, जिद्द आणि ध्येयपूर्तीचा प्रेरणादायी प्रवास आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊनही त्यांनी मोठी स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी अविरत मेहनत घेतली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी घरातील संस्कारांनीच केली. आई अंगणवाडी शिक्षिका असल्याने शिक्षणाची ओढ, शिस्त आणि संवेदनशीलता त्यांनी लहानपणापासून आत्मसात केली. तर वडील पँथर चळवळीपासून उपसरपंच प्रतिनिधीपर्यंत समाजकार्याशी निगडित राहिल्याने अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांच्या रक्तातच भिनली.

 

 

शैक्षणिक वाटचाल पाहिली तर ती अत्यंत उल्लेखनीय आहे. आय.टी.आय. आणि डी.एड. पासून सुरू झालेला प्रवास त्यांनी एल.एल.बी. पर्यंत नेला. ही केवळ पदवी मिळवण्याची गोष्ट नाही, तर विविध क्षेत्रांतील ज्ञान आत्मसात करून स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची धडपड आहे. या बहुआयामी शिक्षणामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक परिपक्व, सशक्त आणि प्रभावी झाले.

ADVERTISEMENT

 

पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी घेतलेली निर्भीड भूमिका विशेष उल्लेखनीय आहे. सत्याला कधीही भीक न घालता, कोणत्याही दबावाला न झुकता त्यांनी समाजातील वास्तव परिस्थिती मांडली. त्यांच्या लेखणीत धार आहे, पण त्यात संवेदनशीलतेची ऊबही आहे. सामान्य माणसाच्या वेदना, प्रश्न आणि संघर्ष यांना त्यांनी आपल्या शब्दांतून आवाज दिला. अन्यायाविरुद्ध उभे राहताना त्यांनी कधीही मागे हटण्याचा विचार केला नाही—हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य आहे.

 

 

अ‍ॅडव्होकेट आणि कायद्याचे अभ्यासक म्हणूनही त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कायद्याचे ज्ञान केवळ स्वतःपुरते न ठेवता ते समाजाच्या हितासाठी वापरणे, ही त्यांची भूमिका अत्यंत प्रेरणादायी आहे. गरजू, वंचित आणि अन्यायग्रस्त लोकांसाठी त्यांनी उभे राहत न्यायाची लढाई लढली आहे.त्यांच्या व्यक्तिमत्त्वात केवळ व्यावसायिक यश नाही, तर माणुसकीची जाण, समाजाबद्दलची बांधिलकी आणि प्रामाणिकपणा हे गुणही ठळकपणे दिसतात. म्हणूनच ते केवळ पत्रकार किंवा वकील नसून, समाजाचा सजग प्रहरी म्हणून ओळखले जातात.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या कार्याचा गौरव करताना प्रत्येकाला अभिमान वाटतो. त्यांनी घेतलेली वाट ही सोपी नाही, पण त्यांनी ती जिद्दीने आणि प्रामाणिकपणे पार पाडली आहे. पुढील आयुष्यातही त्यांची लेखणी अधिक प्रभावी होवो, न्यायासाठीची त्यांची लढाई अधिक बळकट होवो आणि समाजसेवेचा त्यांचा प्रवास अधिक विस्तारत जावो,आपल्या कार्यातून समाजाला दिशा देणारा हा प्रवास असाच तेजस्वी, प्रेरणादायी आणि संघर्षमय राहो…! हीच मनापासून सदिच्छा… पत्रकार तथा अ‍ॅड. रणजित विठ्ठलराव जामखेडकर यांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

शब्दांकन – तुकाराम वाघमोडे | एस.एन.नांदेडकर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!