वाई पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी! चोरीस गेलेले मोबाईल केले परत.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
महाराष्ट्र तसेच इतर राज्यातुन चोरीस गेलेले व गहाळ झालेले एकूण ४२ मोबाईल ९ लाख रुपये किंमतीचे शोध घेऊन तक्रारदार यांना जितेंद्र शहाणे सो पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे यांचे हस्ते केले दि. ३१ रोजी परत.
वाई शहर हे सातारा जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ असुन, पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सदर मोबाईल तक्रारीबाबत गांभीर्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त मोबाईल परत करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने मा.श्री जितेंद्र शहाणे सोो पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे यांनी गुन्हेप्रकटीकरण शाखा यांस योग्य ते मार्गदर्शन करुन सदरचे गहाळ झालेले मोबाईलचा तात्त्काळ छडा लावण्याबाबत आदेश केला होता. त्यानुसार तात्काळ कारवाई करीता महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातुन गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकुण ४२ मोबाईल परत मिळवुन तक्रारदार यांना श्री जितेंद्र शहाणे साो पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे यांचे हस्ते परत केले.
वाई शहर ही सातारा जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ आहे त्यानुसार वाई शहरास एक मोठी ओळख आहे. वाई शहरात आजुबाजुच्या गावातुन हजारोचे संख्येने लोक नोकरी रोजगार व शिक्षण व इतर बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी वाई शहरात येत जात असतात त्यावेळी प्रवासात बाजारपेठेत व इतर ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्हेप्रकटीकरण शाखेने महाराष्ट्र राज्याचे विविध भागामधुन तसेच इतर राज्यातुन मोबाईल परत मिळवत गहाळ झालेले मोबाईल तक्रारदार यांना परत केल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. समिर शेख, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम, यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाणे, तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो. हवा धिरज यादव पो. कॉ राम कोळी, पो.कॉ प्रसाद दुदुस्कर, पो.कॉ नितीन कदम, पो.कॉ हेमंत शिंदे, पो. कॉ श्रावण राठोड, पो. कॉ विशाल शिंदे, पो.कॉ सागर नेवसे, पो. कॉ महेश पवार (सायबर) यांच्या पथकाने केली आहे. मा. पोलीस अधिक्षक साो श्री समीर शेख यांनी वाई पोलीसांचे अभिनंदन केले.